प्रतिनिधी:रवी वाहणे वरूड (अमरावती)
शेंदूरजनाघाट दि. २२ : येथील मलकापूर परिसरात वास्तव्यास असलेल्या गोपाल वामनराव डोईजोड (४२) यांनी आपल्या राहत्या घरातच गळफास लावून आत्म हत्या केल्याची घटना रविवार दि. २२ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.प्राप्त माहितीनुसार, – गोपालकडे गावालगतच शेती असल्याने तो सकाळी शेतातून घरी आला होता. त्याची पत्नी काही दिवसांपासून नागपूर जिल्ह्यातील बिस्नुर येथे माहेरी गेली होती. ती गोपालच्या मोबाईलवर माहेरवरूनच वारंवार कॉल करत होती. परंतु तो आपला मोबाईल उचलत नव्हता. वारंवार रिंग वाजत असल्याने गोपाल फोन का उचलत नाही म्हणून घरी असलेल्या त्याच्या आजारी वडीलांनी वर जाऊन बघितले असता गोपाल गळफास लावलेल्या परिस्थितीत आला. आढळून या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता ग्रामीण रूग्णालयात पाठविला. गोपालने घेवुन आत्महत्या गळफ्फास का केली हे कळू शकले नाही. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहे. गोपाल हा घरातील कर्ता पुरूष असल्याने त्याच्या अचानक जाण्याने डोईजोड कुंटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात आजारी वडील, पत्नी शीतल व विवाहित तीन बहिणी आहेत.