प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. मनोज जरांगेनी आरक्षणासाठी वेगळ ताट घ्यावं, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. यावर उत्तर देताना जरांगे म्हणाले, वेगळ ताट घेतलं तर समाजाची फसवणूक होईल. आंदोलनासाठी मुंबईतील आझाद मैदान द्या, अशी मागणी देखील जरांगेंनी केली आहे. तसेच 20 जानेवारीपासून होणारे आंदोलन चांगलेच भडकणार असल्याचे चिन्ह दिसत आहे. 20 तारखेपूर्वी सरकारला आरक्षण द्यावंच लागेल, असं देखील जरांगे म्हणाले.