२६ एप्रिल ला होणार मतदान

चुनाव

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर

निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा केली त्या क्षणापासून वर्धा लोकसभा मतदार संघात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघात दुस-या टप्प्यात म्हणजे 26 एप्रिल २०२४ रोजी मतदान होणार आहे. देशभरात ४ जून २०२४ रोजी एकाच दिवशी मतमोजणी होईल. लोकशाहीचा उत्सव असलेली ही निवडणूक पारदर्शक व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

CLICK TO SHARE