बल्लारशाह ते मुंबई पुण्याला रेल्वे सुविधा दिल्या बद्दल हंसराज अहिर यांचे केले स्वागत

टेक्नॉलॉजी

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर:चंद्रपूर,मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्रातील लाखो भाविकांसाठी बल्लारशाह येथुन बहुप्रतिक्षित नंदीग्राम एक्स्प्रेस दररोज चालवणे, तसेच बल्लारशाह ते पुणे आठवड्यातुन तिन वेळा गाडी चालवणे, या उल्लेखनीय यश मिळाल्याबद्दल राष्ट्रीय ओबिसी आयोगाचे अध्यक्ष, माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर, चंद्रपूर जिल्हा रेल्वे प्रवासी असो बल्लारशाहच्या वतीने त्यांचे चंद्रपूर कार्यालयात जाऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांचे भावनिक स्वागत केले व इतरही विविध विषयांवर चर्चा केले.चंद्रपुरच्या महाकाली देवीच्या लाखो भाविकांसह नांदेड येथील प्रसिद्ध शिख गुरुद्वारा भेट देणाऱ्या शिख बांधवांसाठी नंदीग्राम एक्स्प्रेस वरदान ठरणार आहे.तसेच हंसराज अहीर यांच्या प्रयत्नामुळे गाडी क्र. २२१५१/२२१५२ काझीपेठ-पुणे आता बल्लारशाह येथून धावेल, तर नवी विशेष गाडी ०१४३९/०१४४० बल्लारशाह-पुणे ही गाडीही धावणार आहे. अशाप्रकारे बल्लारशाह येथून दोन गाड्या चालवल्यामुळे लाखो प्रवाशांपर्यंत विशेषत: उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत ती पोहोचेल. राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान पुण्याहून धावणाऱ्या दोन्ही गाड्यांना शेगाव येथे थांबा देण्यात यावा, त्यामुळे जाणाऱ्या प्रवाशांना फायदा होईल, अशी मागणी करण्यात आली. प्रसिद्ध संत गजानन महाराज यांचे दर्शन घेण्याकरिता करिता. तसेच गाडी क्र. २२१०९/२२११० बल्लारशाह-एलटीटी या गाडीला शेगाव, मनमाड, जळगाव येथे थांबा द्यावा, अशी मागणी करताना ते म्हणाले की, याचा केवळ श्री संत गजानन महाराजच नव्हे तर शिर्डीच्या श्री संत साईबाबांच्या भक्तांनाही मोठा फायदा होणार आहे. जळगावला व्यावसायिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे. गाडी क्र. ०८८०१/०८८०३ बल्लारशाह गोंदिया,०७८१९ बल्लारशाह गोंदिया यापैकी कोणतीही एक गाडी दुर्गपर्यंत वाढवल्यास चंद्रपूर गडचिरोली येथे स्थायिक झालेल्या लाखो कामगारांची सोय होईल आणि डोंगरगड येथील बंबळेश्वरी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचीही सोय होईल. तसेच गाडी क्र. २२६५० चेन्नई-बिलासपूर ते हावडा विस्तार केल्याने चंद्रपूर आणि गडचिरोली येथे स्थायिक झालेल्या लाखो बंगाली समुदायाला सुविधा मिळेल, ट्रेन क्र. १५२३१ बरौनी-गोंदिया एक्स्प्रेसचा बल्लारशाहपर्यंत विस्तार केल्यास उत्तर प्रदेश आणि बिहारच्या प्रवाशांच्या समस्या दूर होतील.  यावर अहिर यांनी वरील सूचनेचा गांभीर्याने विचार करून रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर ठेवण्याचे आश्वासन दिले. शिष्टमंडळात चंद्रपूर जिल्हा रेल्वे प्रवासी एसो. बल्लारशाहचे अध्यक्ष श्रीनिवास सुंचुवार, विकास राजूरकर, ज्ञानेंद्र आर्य, गणेश सैदाणे आदी उपस्थित होते

CLICK TO SHARE