प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
चंद्रपूर शहरातील एका १५ वर्षीय मुलाचा बल्लारपूर तालुक्यातील हडस्ती कढोली पुलाजवळील वर्धा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाला. ही घटना जीत रवींद्र गाऊत्रे (१५, रा. नगिनाबाग, चंद्रपूर) जीतचा शोध घेताना आपत्कालीन विभागाचे पथक. असे मृत मुलाचे नाव आहे.जीत आपल्या तीन मित्रांसह वर्धा नदीच्या हडस्ती – कढोली – पुलाजवळ पोहण्यासाठी गेला होता. तिघेही पोहत असताना जीत खोल पाण्यात गेला. खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. जवळील मित्रांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी नदीपात्रात धाव घेतली.