विविध मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडी बल्लारपूरच्या वतीने पदयात्रा काढत प्रशासनाला निवेदन

अन्य

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर:- दि.12 फेब्रुवारीला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शहरातील विविध समस्या बदल शहरात पदयात्रां काढून चार शासकीय कार्यालयांना निवेदन दिले. हे प्रश्न तात्काळ प्रशासनाने सोडवावे अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी, युवा आघाडी बल्लारपूर द्वारे आयोजित निवेदन पदयात्रा जिल्हा संघटक अजय गावंडे यांच्या नेतृत्वात व सत्यभामा भाले महिला आघाडी जिल्हा सल्लागार, नम्रताताई साव तालुकाध्यक्षा महिला आघाडी व रेखाताई पागडे महिला आघाडी शहराध्यक्षा, शुभम नागापुरे युवा आघाडी शहराध्यक्ष आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. निवेदन पदयात्रेचे संकल्पना संयोजक उमेश ज. कडू शहर कार्याध्यक्ष वंचित बहुजन आघाडी बल्लारपूर यांनी सुत्र संचालन केले.सर्वप्रथम नगरपरिषद बल्लारपूर येथे मुख्याधिकारी यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. मुख्याधिकारी यांच्या वतीने नगररचनाकार अक्षय राऊत यांनी निवेदन स्वीकारले. निवेदनात मागणी करण्यात आली की जुनी नगरपरिषद परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याची रंगरंगोटी करून सौंदर्यकरण तसेच दर्शनीय भागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक हा नामफलक येत्या १४ एप्रिल पूर्वी लावण्याची मागणी प्रामुख्याने करण्यात आली.त्यानंतर पदयात्रा पुढे निघाली जुनी नगरपरिषद परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करून पोलीस स्टेशन बल्लारपूर येथे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले निवेदनात मागणी करण्यात आली की शहरामध्ये अतिशय वेगाने व कर्कश आवाजाने वाहने चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात निवेदन देण्याकरिता गेले असता तेथे निवेदन या विभागाशी संबंधित नसल्याचे सहाय्यक अभियंता श्रेणी – १यांनी सांगितले असून संबंधित विभागासाठी पुढील मार्गदर्शन करीत सहकार्याबद्दल आश्वस्त केले.पुढील निवेदन देण्यात करीता पदयात्रा तहसील कार्यालय बल्लारपूर येथे आल्यावर तहसीलदार त्यांचे मार्फत महामहिम राष्ट्रपती महोदयांना प्रेषित निवेदनात मागणी करण्यात आली की भारत देशात निवडणूक आयोग आजही दोन्ही पद्धतीने मतदान घेत आहे ईव्हीएम द्वारे तसेच पेपर बायलेट द्वारे परंतु पेपर बॅलेट सुशिक्षित अधिकारी कर्मचाऱ्यांना दिले जाते व ईव्हीएमची बळजबरी फक्त सामान्य मतदारांवर करण्यात येते असल्याने अशी मागणी करण्यात येत आहे की सामान्य मतदारांनां सुद्धा मागणी केल्यास पेपर बायलेटचा पुरवठा करण्यात यावा, नाही तर ईव्हीएम मशीन बंद करून जुनी पेपर बालेटची व्यवस्था पुर्ववत कायम करण्यात यावीया निवेदन पदयात्रेत वंचित बहुजन आघाडी चे राकेश पेटकरसर महसचिव सतीश नगराळे, प्रियंकेश शिंगाडे, वनमला भसारकर, प्रज्ञाताई नमनकर, सिद्धार्थ देशाबत देशभ्रतार, प्रभुदासजी देवगडे, डी. वाय. नंदेश्वर, सुधाकर गेडाम, कुंजबिहारी बटघरे, मोनाली नंदेश्वर, स्वीटी लोंढे जोशीला वाघाडे, इंदुताई खरतर आदी बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

CLICK TO SHARE