पुरामध्ये अडकलेले लोक सुखरूप काढले बाहेर
तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लीपूर
वर्धा:हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. भोजनखेडा बोडखी नाल्यालगत गावातील शेतकरी व मजूर नाल्याच्या पाण्यात अडकले होते. अल्लीपूर येथील ठाणेदार विजयकुमार घुले, वर्धा येथील तहसीलदार योगेश शिंदे आणि उपविभागीय अधिकारी आकाश अवतारे यांना माहिती देण्यात आली. माजी सरपंच नितीन चंदनखेडे, निखिल कातोरे,दर्शन कलोडे यांच्यासह काही नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मध्यरात्री एक वाजता पुराच्या पाण्यात अडकलेल्या शेतकरी, मजुरांना आणि ९५ बकऱ्यांना सुखरूप बाहेर काढले. गावातील नागरिकांनी ठाणेदार विजय कुमार घुले व माजी सरपंच नितीन चांदणखेडे,निखील कातोरे,दर्शन कलोडे यांचे आभार व्यक्त केले.
Related News
पुरामुळे बल्लारपूर–राजुरा मार्ग बंद,तेलंगणाकडे जाणारी वाहतूक ठप्प,वाहनांच्या लांबच लांब रांगा
01-Aug-2026 | Sajid Pathan
शंभर वर्षे जुने निंबाचे झाड कोसळून बसचे मोठे नुकसान,मुख्य मार्गावरील वाहतूक ठप्प
16-Jul-2026 | Sajid Pathan
चंद्रपूर जिल्यासाठी मुकेश भांदककर व अमोद गौरकर यांची मानद वन्यजीव रक्षकपदी नियुक्ती
14-Jul-2026 | Sajid Pathan
प्रोजेक्ट अमृत अंतर्गत वणा नदी परिसर स्वच्छता अभियान; संत निरंकारी मिशनचा उपक्रम
22-Feb-2026 | Naved Pathan
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर खरांगणा गोडे येथे ग्रामपंचायतीची व्यापक स्वच्छता मोहीम
11-Jan-2026 | Sajid Pathan
नायलॉन मांजा विक्री-वापरावर पूर्ण बंदी नगर परिषद बल्लारपूरचा इशारा,उल्लंघन केल्यास कठोर कारवाई
07-Jan-2026 | Sajid Pathan