पुरामध्ये अडकलेले लोक सुखरूप काढले बाहेर
तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लीपूर
वर्धा:हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. भोजनखेडा बोडखी नाल्यालगत गावातील शेतकरी व मजूर नाल्याच्या पाण्यात अडकले होते. अल्लीपूर येथील ठाणेदार विजयकुमार घुले, वर्धा येथील तहसीलदार योगेश शिंदे आणि उपविभागीय अधिकारी आकाश अवतारे यांना माहिती देण्यात आली. माजी सरपंच नितीन चंदनखेडे, निखिल कातोरे,दर्शन कलोडे यांच्यासह काही नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मध्यरात्री एक वाजता पुराच्या पाण्यात अडकलेल्या शेतकरी, मजुरांना आणि ९५ बकऱ्यांना सुखरूप बाहेर काढले. गावातील नागरिकांनी ठाणेदार विजय कुमार घुले व माजी सरपंच नितीन चांदणखेडे,निखील कातोरे,दर्शन कलोडे यांचे आभार व्यक्त केले.
Related News
जीवरक्षक फाऊंडेशन ने राज्यपक्षी हरियल अजगर व तीन धामण जातीच्या सापांना दिले जीवदान
08-Nov-2025 | Sajid Pathan
शेतकऱ्यांना हेक्टरी रु.50000/- मदत मिळणे व कर्जमाफी याकरिता उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले
25-Sep-2025 | Sajid Pathan
*कोटेश्वर येथे जागतिक नदी दिन साजरा – वर्धा नदी परिसर स्वच्छ करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश*
24-Sep-2025 | Arbaz Pathan
शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची आ. राजेश बकाने यांच्या कडून पाहणी
14-Sep-2025 | Sajid Pathan