पर्यावरण वाहिनी तर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त स्वच्छ जंगल मोहीम

Thu 05-Jun-2025,11:26 PM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर

बल्लारपूर : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज एपीजे कलाम गार्डन ते सन्मित्र सैनिक विद्यालय दरम्यान पसरलेला प्लास्टिक कचरा पर्यावरण वाहिनीने एका ठिकाणी गोळा केला. सध्या पर्यावरणाच्या समस्येने भीषण स्वरूप धारण केले आहे.जागतिक तापमानवाढीमुळे पृथ्वीचे तापमान सातत्याने वाढत आहे. त्याचप्रमाणे जंगलतोडही मोठ्या प्रमाणावर होत आहे. जंगल कमी झाल्यामुळे जंगलातील प्राणी शहरांमध्ये येत आहेत, त्यामुळे मानव वन्यजीव संघर्षाची नवी समस्या निर्माण झाली आहे. शहरवासीयांचा जंगलात सहलीला जाण्याचा कल सध्या खूप वाढला आहे.लोक तेथे पार्त्या साजरे करतात आणि अन्न खाल्ल्यानंतर तेथे कचरा फेकतात, जो जंगलातील प्राणी खातात आणि नंतर ते आजारी पडतात आणि कधीकधी मृत्यू देखील होतो. काही लोक त्यांच्या घरातील कार्यक्रमातील उरलेले अन्न एपीजे कलाम गार्डन आणि सन्मित्र शाळेच्या दरम्यानच्या आणून टाकतात. त्याचप्रमाणे काही मृत जनावरेही प्लास्टिकच्या पिशव्या मध्ये टाकतात. एवढेच नव्हे तर एका ठिकाणी दवाखान्यातील टाकाऊ साहित्य ज्यामध्ये इंजेक्शन व सिरिंजचा समावेश होता ते टाकण्यात आला.वाईट बाब म्हणजे हा प्लास्टिक कचरा केवळ वन्य प्राणी आणि पक्षी मारत नाही तर जंगलालाही विद्रूप करत आहे. ज्याप्रमाणे आपण आपले घर व परिसर स्वच्छ ठेवतो, त्याचप्रमाणे जंगल स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे, त्यामुळे जंगलाची विटंबना न करता स्वच्छ ठेवण्याचे आवाहन पर्यावरण वाहिनीचे अध्यक्ष मोहम्मद शरीफ यांनी केले.यावेळी विनायकराव साळवे, मनोहर वाडेकर, अनिल वागदरकर, विवेक खुटेमाटे, अमोल काकडे, कार्तिक वहऱ्हाटे, आदित्य प्रकाश नरसिंग गोज, वाजिद खान, मनोज वानखेडे, भास्कर फरकाडे, अश्रफ खान, राजू मारपल्लीवार, सचिन उमरे, वैभव जोशी, अश्विनी मेश्राम, सपना रेवेली, कपिल पेरके, कौरसे गुरुजी आदी उपस्थित होते.