बल्लारशाह शहरात आज जिजाऊ रथयात्रेचे आगमन-स्वागतासाठी मोठ्या संख्येत सहभागी होण्याचे संभाजी ब्रिगेड चे आव्हान
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर.
बल्लारशाह: गेल्या पस्तीस वर्षांपासून शिव फुले शाहू आंबेडकर या आपल्या धरोहरांचा वारसा जपत मराठा सेवा संघ ही पुरोगामी चळवळ समता बंधुता व न्यायावर आधारीत समाजव्यवस्था आपल्या तेहतीस कक्षाच्या माध्यमातून निर्माण करण्याचा प्रयत्न करत आली आहे.जिजाऊ रथयात्रेची सुरुवात १८ मार्च २०२५ ला शहाजी राजे भोसले यांचे जन्मस्थळ वेरुळ पासून झाली असुन सांगता १ मे २०२५ ला पुणे येथील लाल महालात होणार आहे.या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी ठिकठिकाणी जिजाऊ रथयात्रेच्या स्वागताला जनतेचा उत्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.आपल्या बल्लारशाह शहरात दिनांक ११ एप्रिल २०२५ रोज शुक्रवार ला सकाळी १०:३० ला जिजाऊ रथयात्रेचे आगमन होत आहे.तरी सर्वांनी मोठ्या संख्येत सहभागी व्हावे .असे आव्हान संभाजी ब्रिगेड बल्लारशाह च्या वतीने करण्यात आले आहे.
Related News
वर्धेत राज्यस्तरीय शास्त्रीय गायन स्पर्धा संपन्न,शास्त्रीय संगीत हे दैवी विज्ञान – सुनील बुरांडे
5 days ago | Naved Pathan
पालकमंत्री पंकज भोयर यांच्या वाढदिवसानिमित्त नालवाडीत भव्य मोफत आरोग्य शिबिर
12-Jan-2026 | Sajid Pathan
वर्धा युथ फेस्ट २०२६ चा भव्य शुभारंभ; राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देत उत्साहात प्रारंभ
07-Jan-2026 | Sajid Pathan
रिलायंस डिजिटल वर्धा में RNR 2026 के तहत पुरस्कार वितरण एवं प्रेरणादायी कार्यक्रम संपन्न
04-Jan-2026 | Sajid Pathan