माणसानो वेळीच जागृत व्हा निसर्ग जपा-देवानंद दुमाने

जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली
५ जून जागतिक पर्यावरण दिन विशेष देवानंद दुमाने आरमोरी अध्यक्ष वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्था
आरमोरी:आज उन्हामुळे तापमानात प्रचंड वाढ झाली आहे यात दिवसेंनादिवस वाढ होत आहे आज तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअस पेक्षा जास्त वाढलेला आहे. जागतिक ग्लोबल वॉर्मिगचा परिणाम संपूर्ण जगात दिसून येत आहे या उन्हाच्या तडाख्याने माणसाचे जगणे बेहाल झाले आहे. दोन मिनिटे शांत विचार करा हा तापमानाचा पारा भविष्यात ७० ते ८० अंश सेल्सिअसपर्यंत गेला तर त्यात नवल वाटणार नाही. परंतु ८० अंश सेल्सिअस तापमान झाले तर मानव जातीचे व सृष्टीचे काय होईल? निसर्गातील पशु -पक्षी यांना मारून ७० अंश सेल्सिअसवर फ्राय करून खाताना मानवाला खूप आनंद होतो. मानव मोठमोठ्या हॉटेलात जाऊन निसर्गरम्य वातावरणाचा कृत्रिम आनंद घेण्यासाठी भरमसाठ पैसे खर्च करून निसर्गाचा आनंद घेण्याची उत्सुकता मानवामध्ये आहे. परंतु निसर्गाने तापमानात बदल करून घेतला व त्याचा प्रयोग मानवावर केला तर मानवाचे काय हाल होतील याची कल्पना सुद्धा करणे भीतीदायक वाटते.निसर्गात उपलब्ध नैसर्गिक पाण्याचे स्रोत विहिरी,तलाव,नदी,नाले तुडुंब भरलेले पाणी खदखदू लागेल. गरम पाण्याची वाफ होईल. उभ्या असलेल्या मानवी वाहने क्षणात जळून खाक होतील मानव तडपडून मरून जातील निसर्गातील पशु- पक्षी, वृक्ष झाडे हे जळून बेचिराख होतील. आधुनिक काळात मानव कृत्रिम सुखाच्या नादामध्ये नैसर्गिक वनसंपदेचा ऱ्हास करू पाहत आहे. मानव कोंबडे, बकरे, मासे,अंडी यांना तेलात फ्राय करून आनंदाने आस्वाद घेत आहेत. निसर्गाने आपला चमत्कार दाखवला तर माणसाचा देखील फ्राय व्हायला वेळ लागणार नाही.निसर्गामध्ये प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. या जीवनचक्रत बदल घडवण्याचा प्रयत्न केल्यास प्रत्येकाला प्रत्येकाची किंमत मोजावी लागते. निसर्ग तुम्हाला सर्व काही उधार देतो मात्र व्यवहार चुकत नाही. बकरे,कोंबडे,मासे स्वतः बलिदान देतात फ्राय होतात माणसाला स्वाद आणि आनंद देतात. परंतु तुम्ही त्यांना काय देता निसर्ग न्यायाच्या तराजूत मोजमाप करत असते.निसर्गाच्या कोर्टात सर्वांना संधी दिली जाते परंतु निसर्ग आपला न्याय स्वतःच करीत असतो निसर्गातील बदलामुळे उन्हाच्या तापमानात प्रचंड वाढ झाली आहे या वाढीचे दुष्परिणाम मानवाला भोगावे लागत आहे या प्रकोपाचा सर्वात जास्त फटका सामान्य मानसाला बसणार आहे. कारण श्रीमंत धनाढ्य लोक यावर पर्याय शोधतील कूलर, एसी सारख्या चैनीच्या यंत्राचा वापर करून स्वतःला सुरक्षित करतील.परंतु सामान्य माणसाचे काय? पाणी, उष्णता, दुष्काळ, अतिवृष्टी, नापिकी,रोजगार यामुळे होरपळून मरतील. निसर्गाच्या कलेने चालणारी माणसे सुरक्षित राहतील. वाढत्या तापमानाने उष्माघाताने बळी जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. सरकार तुम्हाला सर्व सोयीसुविधा पिण्याच्या पाणी,अन्न,निवारा यांच्या सोय करेल परंतु प्रत्येकाच्या डोक्यावर व घरावर छत्री धरू शकनार नाही संपूर्ण आकाशाला ग्रीन हाऊस आच्छादनासारखे ग्रीन कपडा बसवता आले असते तर बरे झाले असते त्यामुळे वाढत्या तापमानापासून मानवाला सुरक्षित तरी करता आले असते परंतु ते शक्य नाही.निसर्गातील समतोल राखणे ही प्रत्येकाची गरज आहे परंतु वाढत्या तापमानाचे विपरीत परिणाम मानवी जीवनावर होतील.घरातील ऑइलपेंटच्या महालात राहणाऱ्या लोकांना वाटत असेल आम्ही सुरक्षित आहोत परंतु भिंतीवरील पेंटचा बुरखा फाटून भिंतीना भेगा केव्हा पडलेल्या असतील हे सुद्धा कळणार नाही.तलावातील पाणी आटलेले असतील पावसातील पाणी साठवणे अशक्य होईल.जंगलातील वने,झाडे,पशु पक्षी यांचे अस्तित्व नाहीसे होऊन जंगल ओसाड पडतील वाळवंटासारखी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.निसर्गाचे संरक्षण व संवर्धन ही मानवाची प्राथमिक जबाबदारी आहे संकट येण्याअगोदर संकटे रोखणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक मानव हा एहिक सुखाच्या नादामध्ये निसर्गाची राखरांगोळी करून आपल्यालाच असुरक्षित करीत आहे असेच सुरू राहिले तर माडी, बंगले सोडून पुन्हा झोपडीत यावे लागेल परंतु झोपडीवर टाकायला गवतसुद्धा मिळणार नाही. आदिमानवासारखे भटकंती करून डोंगराच्या कडीकपडात,दरीखोऱ्यात राहण्याची पाळी येऊ नये. जी प्रगती मानवाने केली आहे ज्यामुळे मानव निसर्गाकडे दुर्लक्ष करीत आहे. निसर्ग कोपला की या सर्व बाबी गौण आहेत त्यामुळे मानवाने वेळीच जागृत होऊन निसर्गाचे संवर्धन करणे काळाची गरज आहे प्रत्येक पावसाळ्यात वृक्षरोपण करणे त्याची निगा राखणे निसर्गाच्या विरुद्ध न वागता निसर्ग शक्तीचे दास होऊन सेवेला लागा तुमच्या सवयी बदला वसुंधरा मातेचे चरण धुवा निसर्गातील बाप हा बापच असतो हे लक्षात ठेवा.वेळीच सावध व्हा. निसर्ग हे मानवीजीवनातील अनमोल घटक आहे ज्याच्यामुळे मानवी जीवनात जडण घडणं निर्माण होत असते. त्यामुळे निसर्गाचे रक्षण करणे मानवाची गरज आहे.