ब्रह्मपुरी क्रीडा महोत्सव समिती तर्फे जागतिक पर्यावरण दिवसानिमित्य वृक्षारोपण

जिल्हा प्रतिनिधी -विभा बोबाटे गडचिरोली
ब्रम्हपुरी :- नेहमी क्रीडा व सामाजिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम आयोजित करणाऱ्या ब्रह्मपुरी क्रीडा महोत्सव समिती तर्फे आज दिनांक ५ जून २०२५ गुरूवार ला सायंकाळी ठीक ५:३० वाजता जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शहरातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रीडांगणावर वड , करंजी, कडुलिंब व विवीध वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले व विद्यार्थ्यांना पर्यावरणाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले याप्रसंगी या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून चंद्रपूर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशन चे अध्यक्ष प्राचार्य डॉ. देविदास जगनाडे सर, सामाजिक कार्यकर्ते मोंटू पिल्लारे उपस्थित होते याप्रसंगी प्राचार्य डॉ. देविदास जगनाडे सर यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना निसर्गाचे महत्व पटवून दिले याप्रसंगी ते बोलत होते की आज उन्हामुळे तापमानात प्रचंड वाढ झाली आहे यात दिवसेंनादिवस वाढ होत आहे आज तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअस पेक्षा जास्त वाढलेला आहे.जागतिक ग्लोबल वॉर्मिगचा परिणाम संपूर्ण जगात दिसून येत आहे या उन्हाच्या तडाख्याने माणसाचे जगणे बेहाल झाले आहे दोन मिनिटे शांत विचार करा हा तापमानाचा पारा भविष्यात ७० ते ८० अंश सेल्सिअसपर्यंत गेला तर त्यात नवल वाटणार नाही. परंतु ८० अंश सेल्सिअस तापमान झाले तर निसर्गात उपलब्ध नैसर्गिक पाण्याचे स्रोत विहिरी,तलाव,नदी,नाले तुडुंब भरलेले पाणी खदखदू लागेल. गरम पाण्याची वाफ होईल. उभ्या असलेल्या मानवी वाहने क्षणात जळून खाक होतील मानव तडपडून मरून जातील निसर्गातील पशु- पक्षी, वृक्ष झाडे हे जळून बेचिराख होतील.निसर्गामध्ये प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. या जीवनचक्रत बदल घडवण्याचा प्रयत्न केल्यास प्रत्येकाला प्रत्येकाची किंमत मोजावी लागते.वाढत्या तापमानाने उष्माघाताने बळी जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे.निसर्गातील समतोल राखणे ही प्रत्येकाची गरज आहे परंतु वाढत्या तापमानाचे विपरीत परिणाम मानवी जीवनावर होतील.तलावातील पाणी आटलेले असतील पावसातील पाणी साठवणे अशक्य होईल.जंगलातील वने,झाडे, पशु पक्षी यांचे अस्तित्व नाहीसे होऊन जंगल ओसाड पडतील वाळवंटासारखी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे निसर्गाचे संरक्षण व संवर्धन ही मानवाची प्राथमिक जबाबदारी आहे संकट येण्याअगोदर संकटे रोखणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक मानव हा एहिक सुखाच्या नादामध्ये निसर्गाची राखरांगोळी करून आपल्यालाच असुरक्षित करीत आहे असेच सुरू राहिले तर माडी, बंगले सोडून पुन्हा झोपडीत यावे लागेल परंतु झोपडीवर टाकायला गवतसुद्धा मिळणार नाही आदिमानवासारखे भटकंती करून डोंगराच्या कडीकपडात,दरीखोऱ्यात राहण्याची पाळी येऊ नये. जी प्रगती मानवाने केली आहे ज्यामुळे मानव निसर्गाकडे दुर्लक्ष करीत आहे.निसर्ग कोपला की या सर्व बाबी गौण आहेत त्यामुळे वेळीच सावध व्हा. निसर्ग हे मानवीजीवनातील अनमोल घटक आहे ज्याच्यामुळे मानवी जीवनात जडण घडणं निर्माण होत असते. त्यामुळे निसर्गाचे रक्षण करणे मानवाची गरज आहे असे मोलाचे मार्गदर्शन त्यांनी केले याप्रसंगी ब्रह्मपुरी क्रीडा महोत्सव समितीचे पदाधिकारी प्रफुल नागपुरे, देवा मीसार ,रागिणी पानसे, प्रगती उरकुडे,रुचिका मेश्राम,शारदा तलमले,चैतन्य शेंडे,तुषार पाटिल,भुषन ढोरे,रोहित ढोरे, मोहित दोनाडकर, धीरज ढोंगे,अनामिका मोहुर्ले, पूर्वा मेश्राम, प्रितिका सूर्यवंशी , विजय ठाकरे तथा बहुसंख्येने पालक व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन राहुल जुआरे सर यांनी केले तर आभार विहार मेश्राम यांनी मानले.