गट विकास अधिकारी यांचे कडून शेतकऱ्याची थट्टा

जिल्हा प्रतिनिधी-विभा बोबाटे गडचिरोली
गडचिरोली:देसाईगंज तालुक्यातील गट विकास अधिकारी यांचे कडून ग्राम पंचायत ला आज प्राप्त झालेल्या पत्राच्या अनुषंगाने 13 वने 7 % वन महसूल अनुदान योजना सन 2025-2026 अंतर्गत खरीप हंगामा करिता 50% अनुदान तत्वावर बियाणे उपलब्ध असल्याबाबत पत्र तालुक्यातील ग्राम पंचायत यांना पाठवण्यात आले मात्र सध्या च्या स्थिती मध्ये बऱ्याच शेतकऱ्याचे पेरणी करून झाली तर काही शेतकऱ्याचे बियाणे खरेदी करून झाले मग हे शासनाने उपलब्ध करून दिलेले बियाणे चा लाभ कुणाला असा प्रश्न सर्व सामान्य शेतकऱ्याला पडला आहे .त्यातच ह्या पत्राला आवक जावाक क्रमांक नाहीच पण तारीख सुद्धा नाही अशा अनागोंदी कारभारामुळे जनता त्रस्त आहे आणि यामुळे सर्व सामान्य शेतकरी यांचे अन्याय होत आहे तरी संबंधीत अधिकारी यांचे वर वरिष्ठ अधिकारी यांचे कडून कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी कैलास बगमारे भाजपा जिल्हा सह संयोजक पंचायत राज व ग्राम विकास विभाग गडचिरोली यांनी केली आहे