जनावरांचा बाजार बंद करण्याचा आदेश मागे घ्या काँग्रेसचे निवेदन

प्रतिनिधी :- अशोक इंगोले हिंगोली
हिंगोली:वसमत महाराष्ट्रातील कृषी उत्पन्नः बाजार समितीला महाराष्ट्र गोसेवा आयोगाने २९ एप्रिल रोजी दिलेल्या पत्रकात ईद-उल-अजहा २०२५ च्या पार्श्वभूमीवर राज्यभर जनावरांचे बाजार भरवू नयेत, असे आदेश दिला आहे. तो रद्द करावा,अशी मागणी वसमतशहर काँग्रेसच्यावतीने उपविभागीय अधिकाऱ्याकडे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की, आयोगाच्या आदेशानुसार जनावरांचा बाजार भरवला नाही तर केवळ गोवंश नव्हे तर बकरे, म्हशी, शेळ्या यांसारखी जनावरेही गरजवंत शेळीपालक व शेतकयांना विकता येणार नाहीत. सध्या शेतीचे पेरणीचे दिवस असुन अनेक शेतकरी जोडधंदा म्हणून, शेळी,मेंढी पालन करून या उत्पन्नातून शेती पेरणीकरिता बी बियाणे विकत घेतात. परंतु महाराष्ट्र गोसेवा आयोग यांनी पत्र काढून जनावराचे बाजार बंद केल्यामुळे अनेक शेतकरी अडचणीत आले आहेत. या गोसेवा आयोगाच्या आदेशविरोधात सोमवारी वसमत काँग्रेस वतीने उपजिल्हाधिकारी वसमत यांना बाजार समितीला दिलेला आदेश तत्काळ रद्द करून जनावरांचा बाजार पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अब्दुल हफिज अब्दुल रहमान, माजी नगराध्यक्ष खालील अहमद, रियाजुद्दीन कुरेशी मुत्रा मसरूर अँड मोहम्मद हरून, शहराध्यक्ष काँग्रेस, शेख अलीमोद्दीन तालुकाध्यक्ष राजाराम खराटे. आमानुल्ला खान, हाजी शेख महेबूब, राजू पटाईत, बदर चाऊस जाविद दोसती, सय्यद अज्जू, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष साईनाथ जाधव, खलील बागवान अँड ऋषिकेश देशमुख, माजी नगरसेवक रवीकिरण वाघमारे, साईनाथ कुरूंदकर, राजकुमार एंगडे डॉ. नजीब शेख, वसीम बागवान, छोटू कठाळे शे. इरफान बाले, सलाम बागवान, शेख नईम, मुदस्सीर आदींच्या निवेदनावर स्वाक्षन्या आहेत.