शासकीय स्त्री रुग्णालयाजवळील खड्ड्यांचा अनोखा निषेध,प्रशासनाला १५ ऑगस्टचा अल्टीमेटम

Sun 26-Jul-2026,03:54 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी:अशोक इंगोले हिंगोली 

हिंगोली : वसमत येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरून शासकीय स्त्री रुग्णालयाकडे जाणाऱ्या वळणावर पडलेले मोठे खड्डे आणि निकृष्ट दर्जाच्या कामामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या वतीने, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत लोखंडे-थोरावेकर यांनी रस्त्यावर उगवलेल्या खड्ड्यांना गुलाबपुष्प वाहून अत्यंत आगळावेगळा व आक्रमक निषेध नोंदवला आहे.

निकृष्ट कामामुळे नालीवर पडले मोठे खड्डे वसमत येथील शासकीय स्त्री रुग्णालयाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर आणि वळणावरील नालीवर अत्यंत निकृष्ट दर्जाचे बांधकाम करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. गजाळ्यांखाली व्यवस्थित बांधकाम न केल्यामुळे काही दिवसांतच नाली खचून तिथे मोठे खड्डे पडले आहेत. या निकृष्ट कामाबद्दल आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.मोठ्या दुर्घटना आणि जीवीतहानीची शक्यता या रहदारीच्या रस्त्यावरून दररोज हजारो नागरिक ये-जा करत असतात, ज्यामध्ये प्रामुख्याने खालील घटकांचा समावेश आहे:आपत्कालीन सेवा देणाऱ्या रुग्णवाहिका

गर्भवती महिला व रुग्ण डॉक्टर आणि शासकीय कर्मचारी,शाळकरी विद्यार्थी व सामान्य नागरिक या खड्ड्यांमुळे रात्रीच्या वेळी किंवा घाईच्या प्रसंगी मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

 सामाजिक कार्यकर्त्याचे कडक इशारे व मागण्या.

घटनास्थळी निषेध व्यक्त करताना प्रशांत लोखंडे-थोरावेकर यांनी प्रशासनाला आणि संबंधित कंत्राटदाराला धारेवर धरले असून खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत:

 1.तातडीने दुरुस्ती

कंत्राटदाराने तात्काळ घटनास्थळी येऊन नालीचे व रस्त्याचे बांधकाम नव्याने आणि दर्जेदार करावे.

 2. गुन्हा दाखल करण्याची मागणी: या खड्ड्यांमुळे भविष्यात कोणताही अपघात घडल्यास, त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची राहील आणि त्याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा

 3. आमरण उपोषणाचा इशारा:*प्रशासनाला याबाबत सविस्तर निवेदन देण्यात आले असून, जर हे काम १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण झाले नाही, तर १५ ऑगस्टपासून उपविभागीय कार्यालय, वसमत समोर आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा गंभीर इशारा त्यांनी दिला आहे.

या आंदोलनामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, नागरिकांमधून या आंदोलनाचे स्वागत होत आहे. आता प्रशासन यावर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.