पुरामध्ये अडकलेले लोक सुखरूप काढले बाहेर

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लीपूर
वर्धा:हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. भोजनखेडा बोडखी नाल्यालगत गावातील शेतकरी व मजूर नाल्याच्या पाण्यात अडकले होते. अल्लीपूर येथील ठाणेदार विजयकुमार घुले, वर्धा येथील तहसीलदार योगेश शिंदे आणि उपविभागीय अधिकारी आकाश अवतारे यांना माहिती देण्यात आली. माजी सरपंच नितीन चंदनखेडे, निखिल कातोरे,दर्शन कलोडे यांच्यासह काही नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मध्यरात्री एक वाजता पुराच्या पाण्यात अडकलेल्या शेतकरी, मजुरांना आणि ९५ बकऱ्यांना सुखरूप बाहेर काढले. गावातील नागरिकांनी ठाणेदार विजय कुमार घुले व माजी सरपंच नितीन चांदणखेडे,निखील कातोरे,दर्शन कलोडे यांचे आभार व्यक्त केले.
Related News
शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची आ. राजेश बकाने यांच्या कडून पाहणी
46 mins ago | Sajid Pathan
खुरसापार शिवारातील शेतकरी भयभीत वनविभागाच्या ऑफिसमध्ये केला तीन तास ठिय्या आंदोलन,
1 days ago | Sajid Pathan
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सालेकसा तालुका द्वारे फळ वितरण आणि वृक्षारोपण कार्यक्रम
22-Jul-2025 | Sajid Pathan